शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

मराठा-मुस्लीम यांना महाराष्ट्रात आरक्षण

महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने २५ जून, २०१४ रोजी असा निर्णय घेतला आहे की मराठ्यांना १६% आणि मुस्लीमांना ५% आरक्षण शिक्षण आणि नोकरीत द्यायचे. मंत्रीमंडळाने असा निर्णय एकमताने घेतला आहे. हा निर्णय तात्काळ लागु करण्यात आला आहे. कोणत्याही विरोधीपक्ष नेत्याने वा इतर कोणी याचा विरोध केला नाही.

परंतू प्रसारमाध्यमांनी असे दाखविले आहे की हा निर्णय निवडणुकित फायदा होण्यासाठी घेतला आहे. अजित पवार यांनी सांगितले की २००४ पासून मराठा संघटना या आरक्षणाची  मागणी करत होते. त्यासाठी राणे समिति नेमाली होती. त्यांनी मराठ्यांना २०% आरक्षणाची शिफारस केली होती. यासाठीचे निकष सांगताना ते म्हणाले की महाराष्ट्रात मराठा समाज साधारणपणे ३२% आहे म्हणुन त्याच्या अर्धे म्हणजे १६% आणि मुस्लीम समाज १०% आहे म्हणून त्याच्या ५% आरक्षण दोन्ही समाजाला दिले आहे. या  आरक्षणाला जर कोणी कोर्टात आव्हान दिले तर ते टिकेल का असे विचारता अजित पवार म्हणाले, ती सर्व खबरदारी घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. मागासवर्गीय आयोगाचीही याला संमती आहे.

असेच पृथ्वीराज चव्हाण यांनीही आयबीएन लोकमतचा पत्रकार आशीष जाधव याला सांगितले. परंतु त्याचे म्हणणे असे होते की मराठा समाज इतका पुढारलेला, एवढे बोलताच चव्हाण म्हणाले तुम्ही फक्त काही लोकांकडे पाहता, परंतु बराचसा समाज अजुन मागासलेलाच आहे. त्याला असे म्हणायचे असेल की जास्त प्रमाणात मराठा समाजाचेच आमदार आणि मंत्री आहेत. पण म्हणून तर यात राजकीय आरक्षण नाही. असेही कळते की क्रीमीलेयर नियम यालाही लागु होईल.

आता महाराष्ट्रात एकून ७३% आरक्षण लागु झाले आहे. आयबीएन लोकमतचा अँकर असे म्हणत होता की आपला महाराष्ट्र एवढा मागासलेला आहे काय की ७३% आरक्षण देण्याची आवश्यकता पडत आहे.

तसे पाहिले तर जातीला आरक्षण देणे हे चुकीचे आहे असे माणणाऱ्या अनेक संघटना, लोक, पंथ भारतात आहेत. आणि त्या जातीच्या आधारावर आरक्षण देण्यास विरोध करतात. त्यासाठी आंदोलनेही करतात. या बाबतीत त्यांच्या भूमिकाही खुप कठोर असतात.

भाजपचे विनोद तावडे यांनीही आरक्षणाला पाठिंबा जाहिर केला, परन्तु त्यांना असे वाटत होते की सरकारने विधिमंडळात कायदा करुण हे आरक्षण द्यायला पाहिजे होते. कोर्टात हा निर्णय अडकू शकतो.

रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांचाही या आरक्षणाला पाठिंबा आहे. हे आरक्षण कोर्टात टिकावे म्हणून सरकारने उत्तम वकील द्यावेत असे ते म्हणतात. त्यांच्या म्हणण्यावरुण असा अंदाज बांधता येतो की या निर्णया विरोधात कोणीना कोणी कोर्टात जाईल.

माझं स्वत:चं असं मत आहेकी कांग्रेस, राष्ट्रवादिने हा निर्णय घिसाडघाईने घेतला आहे. या निर्णयाचं कायद्यात रूपांतर करायला पाहिजे होतं. मोदींच्या लाटेच्या भीतीमुळे दोन्ही समाजाला खुश करुण विधानसभेत फायदा व्हावा याच इच्छेने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. कोर्टात हा निर्णय टिको अगर न टिको, पुढचं पुढे बघता येईल असा विचार असावा. निवडून आल्यावर सांगता येईल की निवडणुकित आश्वासनं द्यावेच लागतात. जसं सुशिलकुमार शिंदेंनी शेतकऱ्यांचे विजेचे बिल माफ करण्याचे दिले होते आणि निवडून आल्यावर टायपींग चुक झाली असे म्हणाले होते. काय सांगावं हेही तसेच असेल.

काल म्हणजे २६ जूनला कोणी पत्रकाराने शरद पवार यांना विचारले की निवडणुकित फायदा होण्यासाठी तुम्ही आरक्षण आता दिले आहे कां? तर ते म्हणाले

'मराठा आरक्षणाची मागणी आम्ही केली नव्हती. ती अनेक वर्षांपासून होत होती. आता ती मान्य झाली आहे इतकेच. या निर्णयाचा निवडणुकीत फायदा होऊ शकतो. तसा पक्षाला फायदा झाला, तर ते चांगलेच आहे. सर्वांचाच फायदा होत असेल, तर ताकाला जाऊन भांडे लपवायला राष्ट्रवादी म्हणजे साधू-संतांची टोळी आहे का?' वा !! किती बिनधास्त.
बाळासाहेब ठाकरेंची जिगर पवारांत आली वाटतेय.

शनिवार, ९ मे, २०१५

सोनियाबाई! लगे रहो!

दिनांक : भारतीय सौर १८, वैशाख शके १९३७
८ मे २०१५

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सारी सत्ता केंद्रित झाली आहे.' असा गंभीर (?) आरोप बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला. 'एक व्यक्ती आणि काही निवडक लोकांचे हे सरकार, आठ महिन्यांपासून स्वतःला चौकशीपासून वाचवण्यासाठी माहिती आयुक्तांची नेमणूक करण्याचे टाळत आहे.' अशी 'घणाघाती' (?) टीका सोनियांनी केली.
-मटा बातमी
७.४.२०१५

वा! सोनियाबाई वा! काय गंभीर आरोप आपण केला आहे. पण याची सुरूवात कोणी केली होती. अहो बाई! सार्‍या जगाला माहित आहे की काँग्रेसच्या काळात सत्ता कुठे केंद्रित झाली होती. टाइम मासिकाने सुद्धा तुम्हाला जगातील शक्तीशाली महिलांच्या यादीत स्थान दिले होते. ते कसे काय? कसले गंभीर (पुचाट!) आरोप करता? अहो! त्या आमच्या पंतप्रधान मनमोहन सिंगांना तुम्ही फक्त 'सह्याजीराव' करून ठेवले होते. एका वर्षातच त्याचा विसर पडला काय? स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसर्‍याचे पाहायचे वाकून -सोडून द्या असे वागणे. पटेल असे काहीतरी बोला. उगीच मगरीचे अश्रु नका ढाळू. कोणीही लक्ष देणार नाही अशाने तुमच्याकडे. मनमोहन सिंगांना नुसते 'आधुनिक वेठबिगार' बणवून ठेवले होते तुम्ही आणि तुमच्या त्या 'चंपक' मुलाने. पटेल, रुचेल असे काहीतरी बोला बाई. नाहीतर हत्ती चाललाय ऐटीत आणि तुम्ही आपले बसलाय..... बघा पटले तर. मला काय? मला एक सांगा की माहिती आयुक्तांची नेमणूक केली तर कोणाच्या जास्त चौकशा होतील? तुमच्या सरकारच्या की भाजप सरकारच्या? ते तर आत्ताच वर्षापूर्वी आलेत. 'झाकली मुठ सव्वा लाखाची' असते बाई. ती तशीच राहू द्या. कशाला 'खाजून खाजून अवधान' आणायचा प्रयत्न करताय. आमच्या पवार साहेबांकडून शिका काहीतरी. त्यांचं बघा कसं असतं. 'चित भी मेरी, पट भी मेरी.' बाकी तुम्ही समजदार आहात. लोक हसतील मलाच, तुम्हाला इतके समजावत बसलो तर. रामराम!

या मटाला पण काहीच कळत नाही. अहो कशालाही काहीही बोलता? 'गंभीर आरोप' काय? घणाघाती टीका काय? यामुळे तुम्हाला तरी कोणी गंभीरपणे घेईल काय? घण म्हणजे हातोडा. तोही मोठा हातोडा. मला तर ही स्मार्टफोनवर मारलेली टिचकी पण नाही वाटत. वापरा पण, तुम्ही वापरा. मराठी भाषेत शब्दांना काहीच कमतरता नाही. वापरायचे ते शब्द वापरा. भारीभारी शब्द वापरा. परिणाम शुन्यच आहे.

आपला हितचिंतक,
-रामदास पवार
अंबरनाथ
(८.५.२०१५)

शुक्रवार, २७ जून, २०१४

रेल्वेची 14.2% भाडेवाढ- मोदी सरकार चा पहिला झटका

दिनांक: 20 जून, 2014

आयबीएन लोकमतवर आज शुक्रवार दिनांक 20 जून, 2014 ला आजचा सवाल होता

'केंद्र सरकारने 14.2% केलेली रेल्वे भाडेवाढ अपरिहार्य आहे का ?

या कार्यक्रमाला अँकर होत्या अलका. निखिल वागळे रजेवर होते. कार्यक्रमाच्या शेवटी जनमताचा कौल होता.

होय 77%        नाही 23%

म्हणजे 77% लोक मोदी सरकारच्या बाजूने आहेत. लोकांना ही भाडेवाढ अपरिहार्य वाटली कारण काँग्रेसच्या (UPA-2) मागील 10 वर्षांच्या काळात एकदाही रेल्वेची भाडेवाढ केलेली नाही. त्यामुळे रेल्वे डबघाईला आली आहे.

आजच्या सवालला भाजपचे अतुल भातळकर, कम्युनीष्ट पक्षाचे अजित अभ्यंकर, काँग्रेसचे भाई जगताप, पत्रकार सुरेश भटेवारा आणि रेल्वे असोसिएशनचे प्रतिनिधी असे लोक उपस्थित होते. कोण काय बोलले ते पहा.

अलका भातळकर यांना: तुमच्या सरकारने ही भाडेवाढ रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करताना संसदेत का नाही केली. मधेच अशी भाडेवाढ का?

भातळकर: रेल्वेला सध्या रोज 30 कोटी म्हणजे महिन्याला 900 कोटी रुपये तोटा होत होता. तसेच रेल्वेला ओव्हरड्राफ्ट घ्यावा लागला आहे. म्हणून ही वाढ आवश्यक होती.

अभ्यंकर: ही भाववाढ चुकीची आहे. या सरकारला व्हिजनच नाही. संसदेत चर्चा घडवून अणायाला पाहिजे होती.

भातळकर: रेल्वे ही पेशंट होउन ICU मधे होती म्हणून हे ऑपरेशन करणे आवश्यक होते.

भटेवारा: ही भाडेवाढ आवश्यक होती हे खरे आहे. रेल्वेच्या भाडेवाढीसाठी एक समिति आहे. ह्या समितीने फेब्रुवारी 2014 लाच मनमोहन सरकारला भाडेवाढ करायला सांगितले होते. परंतु त्यांनी ती पुढे ढकलली. 16 मे ला ते भाडेवाढ करणार होते परंतु ते म्हणाले की नविन सरकारच हा निर्णय घेईल. तरीही नवीन सरकारने संसदेच्या अधिवेशनात ही बाब मांडायाला हवी होती. एव्हडी घाई नको होती.

भातळकर: पेशंट ICU मधे असल्यावर ऑपरेशन करणे कसे थांबवता येईल.

अभ्यंकर बोलत असताना भातळकर मधेच बोलले तर अलका त्यांना म्हणाली आता तुमचे सरकार आले आहे तर त्यांना बोलू द्या ना ! आयबीएन लोकमतवर भाजपच्या लोकांना असेच गप्प बसवले जाते.

मला एकाचेच म्हणने पटले ते म्हणजे प्रवासी संघटनेचे प्रवक्ता यांचे. त्यांचे म्हणने होते की भाववाढ आवश्यक होती, पण ती थोडीथोडी आणि टप्प्याटप्प्याने करायला पाहिजे होती.

या भाववाढीविषयी बऱ्याच जणांनी 'हेच मोदी सरकारचे आच्छे दिन आहेत काय ? अशी टर उडवली. एका महिन्याच्या आत मोदिंनी लोकांना महगाईच्या खाईत लोटले असे बाहेरही मुले बोलत होती.


खरे पाहिले तर मुंबईकरांसाठी ही भाडेवाढ फक्त १४.२% नसून १००% ते १५०% आहे. कारण दरवाढी बरोबरच रेल्वेने मासिक पासात अशी वाढ केली आहे की पासाची किंमत दुपटीने वाढली आहे. आणि हे फक्त मुंबईकरांसाठीच आहे. कारण रेल्वेला मुंबईच्या लोकल गाड्यांतुनच सर्वाधिक उत्पन्न मिळते आणि सुविधा काही नाहीत. चेंगराचेंगरीतच प्रवास करावा लागतो. इतर राज्यातील बरेचसे प्रवासी फ़ुकटे असतात.
यापूर्वी मासिक पासासाठी १५  एकेरी प्रवासाच्या  तिकिटाचे दर एकत्रीत करुण मासिक पासाची किंमत काढायचे ते आता ३० एकेरी प्रवासाच्या तिकिटाचे दर एकत्रित करुण मासिक पास देण्याचे ठरले आहे. त्यामुळे मुंबई उपनगरी लोकल पासाचे दर एकदम दुप्पट ते अडीचपट झाले. हे मुंबईच्या लोकांसाठी अन्यायकारक दरवाढ आहे. यामुळेच बरेचसे लोक चिडले आहेत. आंदोलने, रास्ता रोको, रेल रोको, ठिय्या आंदोलन असे बरेच काही चालले आहे.

सुरुवातीलाच भाववाढ करायची आणि निवडणुका आल्यावर करायची नाही हे काँग्रेसचे राजकारण मोदी सरकारने करू नये एवढिच मोदींकडून अपेक्षा.

या बाबत आनंदाची बातमी आली आहे, ती नंतर सांगतो.

सोमवार, १६ जून, २०१४

राज ठाकरे निवडणुक लढ़वणार


दिनांक: 1 जून, 2014

काल मुंबईच्या सोमय्या कॉलेज (शिव, सायन) मैदानावर राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. सभेला दिडदोन लाखाची गर्दी होती. 'मला तुमच्याशी काही बोलायाचय' असे आवाहन करुण सभा भरवली होती. हरल्या नंतर इतक्या लवकर सभा घेणारा मी पहिलाच असे ते म्हणाले. त्यांच्या भाषणात त्यांनी खालील मुद्दे मांडले.

1. ही निवडणुक पूर्णत: मोदिंची होती. आणि जे कोणी महायुतुचे उमेदवार निवडून आले आहेत ते फक्त मोदींच्या नावामुळेच निवडून आले आहेत. पंतप्रधान झाल्याबद्दल आणि पूर्ण बहुमत मिळवल्याबद्दल त्यांनी मोदिंचे अभिनंदन केले.

2. त्यांनी हेही सांगितले की महात्मा गांधींचा खरा अनुयायी कोण असेल तर राहुल गांधी. कारण गांधींनी सांगितले होते की कॉंग्रेस विसर्जित करा, ते फक्त राहुल गांधीनेच करुण दाखवले.



3. पत्रकार विचारतात की तुम्ही नाशिक मधे काही केले नाही म्हणून हरले. त्यांनी मग पत्रकाराला एक फाइल दाखवली ज्यात चालू असलेल्या कामांची जंत्री होती. पत्रकाराने विचारले तुम्हाला नाशिकला निवडून येउन किती वर्षे झाली. तेव्हा राज म्हणाले साधारण दोन वर्ष. पत्रकार म्हणतो फ़क्त दोन वर्ष ? बरेच काम होत आहे.  आणि तरीही तो पत्रकार  म्हणतो काय  करणार  आम्हाला तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत ना?

त्यांनी असेही सांगितले की नाशिक महापालिका त्यांच्याकडे आली तेव्हा पलिकेवर साडेसहाशे कोटींचे कर्ज होते. ऑक्ट्रोय  खाजगी कंपनीकडे होता. तो पालिकेने स्वत: जमवायला सुरुवात केली तर दोनशे कोटी उत्पन्न वाढले. इतर महापालिके मधे तीस तीस वर्षे सत्ता असुनही त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही, मग मलाच का? हा शिवसेनेला टोला होता. नाशिक मधे कोणती कामे चालू आहेत त्याची फाइलच त्यांनी दाखवली. नाशिकच्या नगरसेवक, पदाधिकारी यांनाही त्यांनी झापले. मी तुम्हाला निवडून अणायाचे आणि तुमचा प्रवक्ताही व्हायचे काय? केलेल्या कामाची माहिती तुम्ही लोकांना द्यायला नको का असेही ते म्हणाले.

4. लोकसभेला मी उमेदवार उभे करणार नव्हतो. पण आमच्या पदाधिकारी आणि इतर यांच्या आग्रहामुळे मी उमेदवार उभे केले. त्यांनी मनसेला मत दिलेल्या मतदारांचेही आभार मानले. पराभव हा सत्ताधारी पक्षाचा होतो विरोधाकांचा नाही असे ते म्हणाले.

5. विधानसभेच्या निवडणुकीला तेही उभे राहतील असे त्यांनी जाहीर केले आणि आमच्या निवडून आलेल्या लोकांचे मीच नेतृत्व करेल असेही ते म्हणाले. राज ठाकारेंनी पराभवानंतर लगेच सभा घेतली हे एक वेगळेपण आहे. परंतु त्यांच्या भाषणात नेहमीचा जोश नव्हता. निवडूण आलेल्या लोकांचे मीच नेतृत्व करेल असे ते म्हणाले परंतु मीच मुख्यमंत्री होईन हे बोलण्याचे त्यांनी टाळले. त्यांनी केलेल्या भाषणात बरेचसे मुद्दे अर्धवट राहिले असे वाटले.

आपल्या भाषणात त्यांनी कॉंग्रेसला निशाना बनवले तरी शिवसेना आणि भाजप यांच्यावरही टिका केली. मला असे वाटतेकी शिवसेना आणि भाजप यांना टीकेचे लक्ष करणे चुकीचे आहे. कारण हे दोन्ही पक्ष विरोधी पक्ष आहेत. त्यांच्यावर टिका करुण काहिही फायदा होणार नहीं. कारण लोक सत्ताधारी पक्षाला कंटाळले आहेत. विरोधी पक्षांवर टिका करणे म्हणजे सत्ताधारी पक्षाची बाजु घेणे.

सध्या  मोदिंची लाट आहे आणि ती चार महिन्यांवर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकी पर्यंत टिकेल हे नक्की. (महायुतिने आपआपसात भांडणे न केल्यास). सध्यातरी  मनसेने एकटे निवडणुक लढावणे पक्षाला घातक आहे. मागील तेरा आमदार राखनेही अवघड आहे.

म्हणून मनसेकडे तीन पर्याय उरतात. हे पर्याय फायद्या  प्रमाणे आहेत.

1. सरळ सरळ महायुतीत सामील होणे -शिवसेना विरोध करीलच यात काही शंका नाही. परंतु गडकरींच्या सांगण्यावरून राज ठाकारेंनी भाजप विरोधात उमेदवार उभे केले नाहीत. (दोन अपवाद वगळता) त्यामुळे गडकरी युतिमधे मनसेला घेण्याविषयी दबाव आणु शकतील.

2. कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि महायुती सोडून शेतकरी कामगार पक्ष, प्रकाश अंबेडकर यांचा पक्ष, असे छोटे मोठे पक्ष यांची मोट बांधणे

3. कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीशी युती (aliance) करणे. - यूपी- बिहारी यांच्या विरोधातील आंदोलनामुळे पूर्वी कॉंग्रेस या युतीस कधीही तयार झाली नसती. परंतु आताची परिस्तिथि वेगळी आहे. यूपी-बिहार मधे कॉंग्रेसला काही बेसच राहिलेला नाही. मग डर कशाला. राष्ट्रवादीचा यूपी-बिहारशी काडीचाही संबंध नाही. आणि आपले पवार कधी कुठे जातील, कोणाशी युती-आघाडी करतील याचा काहीच नेम नसतो. राजची पवार साहेबांनी बऱ्याच वेळा प्रशंषा केली आहे. अजित पवारही राजविषयी कधीतरी चांगले बोलले आहेत.

हा तीसरा पर्याय मनसेला तारुही शकतो आणि मारुही.