सोमवार, १६ जून, २०१४

राज ठाकरे निवडणुक लढ़वणार


दिनांक: 1 जून, 2014

काल मुंबईच्या सोमय्या कॉलेज (शिव, सायन) मैदानावर राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. सभेला दिडदोन लाखाची गर्दी होती. 'मला तुमच्याशी काही बोलायाचय' असे आवाहन करुण सभा भरवली होती. हरल्या नंतर इतक्या लवकर सभा घेणारा मी पहिलाच असे ते म्हणाले. त्यांच्या भाषणात त्यांनी खालील मुद्दे मांडले.

1. ही निवडणुक पूर्णत: मोदिंची होती. आणि जे कोणी महायुतुचे उमेदवार निवडून आले आहेत ते फक्त मोदींच्या नावामुळेच निवडून आले आहेत. पंतप्रधान झाल्याबद्दल आणि पूर्ण बहुमत मिळवल्याबद्दल त्यांनी मोदिंचे अभिनंदन केले.

2. त्यांनी हेही सांगितले की महात्मा गांधींचा खरा अनुयायी कोण असेल तर राहुल गांधी. कारण गांधींनी सांगितले होते की कॉंग्रेस विसर्जित करा, ते फक्त राहुल गांधीनेच करुण दाखवले.



3. पत्रकार विचारतात की तुम्ही नाशिक मधे काही केले नाही म्हणून हरले. त्यांनी मग पत्रकाराला एक फाइल दाखवली ज्यात चालू असलेल्या कामांची जंत्री होती. पत्रकाराने विचारले तुम्हाला नाशिकला निवडून येउन किती वर्षे झाली. तेव्हा राज म्हणाले साधारण दोन वर्ष. पत्रकार म्हणतो फ़क्त दोन वर्ष ? बरेच काम होत आहे.  आणि तरीही तो पत्रकार  म्हणतो काय  करणार  आम्हाला तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत ना?

त्यांनी असेही सांगितले की नाशिक महापालिका त्यांच्याकडे आली तेव्हा पलिकेवर साडेसहाशे कोटींचे कर्ज होते. ऑक्ट्रोय  खाजगी कंपनीकडे होता. तो पालिकेने स्वत: जमवायला सुरुवात केली तर दोनशे कोटी उत्पन्न वाढले. इतर महापालिके मधे तीस तीस वर्षे सत्ता असुनही त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही, मग मलाच का? हा शिवसेनेला टोला होता. नाशिक मधे कोणती कामे चालू आहेत त्याची फाइलच त्यांनी दाखवली. नाशिकच्या नगरसेवक, पदाधिकारी यांनाही त्यांनी झापले. मी तुम्हाला निवडून अणायाचे आणि तुमचा प्रवक्ताही व्हायचे काय? केलेल्या कामाची माहिती तुम्ही लोकांना द्यायला नको का असेही ते म्हणाले.

4. लोकसभेला मी उमेदवार उभे करणार नव्हतो. पण आमच्या पदाधिकारी आणि इतर यांच्या आग्रहामुळे मी उमेदवार उभे केले. त्यांनी मनसेला मत दिलेल्या मतदारांचेही आभार मानले. पराभव हा सत्ताधारी पक्षाचा होतो विरोधाकांचा नाही असे ते म्हणाले.

5. विधानसभेच्या निवडणुकीला तेही उभे राहतील असे त्यांनी जाहीर केले आणि आमच्या निवडून आलेल्या लोकांचे मीच नेतृत्व करेल असेही ते म्हणाले. राज ठाकारेंनी पराभवानंतर लगेच सभा घेतली हे एक वेगळेपण आहे. परंतु त्यांच्या भाषणात नेहमीचा जोश नव्हता. निवडूण आलेल्या लोकांचे मीच नेतृत्व करेल असे ते म्हणाले परंतु मीच मुख्यमंत्री होईन हे बोलण्याचे त्यांनी टाळले. त्यांनी केलेल्या भाषणात बरेचसे मुद्दे अर्धवट राहिले असे वाटले.

आपल्या भाषणात त्यांनी कॉंग्रेसला निशाना बनवले तरी शिवसेना आणि भाजप यांच्यावरही टिका केली. मला असे वाटतेकी शिवसेना आणि भाजप यांना टीकेचे लक्ष करणे चुकीचे आहे. कारण हे दोन्ही पक्ष विरोधी पक्ष आहेत. त्यांच्यावर टिका करुण काहिही फायदा होणार नहीं. कारण लोक सत्ताधारी पक्षाला कंटाळले आहेत. विरोधी पक्षांवर टिका करणे म्हणजे सत्ताधारी पक्षाची बाजु घेणे.

सध्या  मोदिंची लाट आहे आणि ती चार महिन्यांवर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकी पर्यंत टिकेल हे नक्की. (महायुतिने आपआपसात भांडणे न केल्यास). सध्यातरी  मनसेने एकटे निवडणुक लढावणे पक्षाला घातक आहे. मागील तेरा आमदार राखनेही अवघड आहे.

म्हणून मनसेकडे तीन पर्याय उरतात. हे पर्याय फायद्या  प्रमाणे आहेत.

1. सरळ सरळ महायुतीत सामील होणे -शिवसेना विरोध करीलच यात काही शंका नाही. परंतु गडकरींच्या सांगण्यावरून राज ठाकारेंनी भाजप विरोधात उमेदवार उभे केले नाहीत. (दोन अपवाद वगळता) त्यामुळे गडकरी युतिमधे मनसेला घेण्याविषयी दबाव आणु शकतील.

2. कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि महायुती सोडून शेतकरी कामगार पक्ष, प्रकाश अंबेडकर यांचा पक्ष, असे छोटे मोठे पक्ष यांची मोट बांधणे

3. कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीशी युती (aliance) करणे. - यूपी- बिहारी यांच्या विरोधातील आंदोलनामुळे पूर्वी कॉंग्रेस या युतीस कधीही तयार झाली नसती. परंतु आताची परिस्तिथि वेगळी आहे. यूपी-बिहार मधे कॉंग्रेसला काही बेसच राहिलेला नाही. मग डर कशाला. राष्ट्रवादीचा यूपी-बिहारशी काडीचाही संबंध नाही. आणि आपले पवार कधी कुठे जातील, कोणाशी युती-आघाडी करतील याचा काहीच नेम नसतो. राजची पवार साहेबांनी बऱ्याच वेळा प्रशंषा केली आहे. अजित पवारही राजविषयी कधीतरी चांगले बोलले आहेत.

हा तीसरा पर्याय मनसेला तारुही शकतो आणि मारुही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा