शुक्रवार, २७ जून, २०१४

रेल्वेची 14.2% भाडेवाढ- मोदी सरकार चा पहिला झटका

दिनांक: 20 जून, 2014

आयबीएन लोकमतवर आज शुक्रवार दिनांक 20 जून, 2014 ला आजचा सवाल होता

'केंद्र सरकारने 14.2% केलेली रेल्वे भाडेवाढ अपरिहार्य आहे का ?

या कार्यक्रमाला अँकर होत्या अलका. निखिल वागळे रजेवर होते. कार्यक्रमाच्या शेवटी जनमताचा कौल होता.

होय 77%        नाही 23%

म्हणजे 77% लोक मोदी सरकारच्या बाजूने आहेत. लोकांना ही भाडेवाढ अपरिहार्य वाटली कारण काँग्रेसच्या (UPA-2) मागील 10 वर्षांच्या काळात एकदाही रेल्वेची भाडेवाढ केलेली नाही. त्यामुळे रेल्वे डबघाईला आली आहे.

आजच्या सवालला भाजपचे अतुल भातळकर, कम्युनीष्ट पक्षाचे अजित अभ्यंकर, काँग्रेसचे भाई जगताप, पत्रकार सुरेश भटेवारा आणि रेल्वे असोसिएशनचे प्रतिनिधी असे लोक उपस्थित होते. कोण काय बोलले ते पहा.

अलका भातळकर यांना: तुमच्या सरकारने ही भाडेवाढ रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करताना संसदेत का नाही केली. मधेच अशी भाडेवाढ का?

भातळकर: रेल्वेला सध्या रोज 30 कोटी म्हणजे महिन्याला 900 कोटी रुपये तोटा होत होता. तसेच रेल्वेला ओव्हरड्राफ्ट घ्यावा लागला आहे. म्हणून ही वाढ आवश्यक होती.

अभ्यंकर: ही भाववाढ चुकीची आहे. या सरकारला व्हिजनच नाही. संसदेत चर्चा घडवून अणायाला पाहिजे होती.

भातळकर: रेल्वे ही पेशंट होउन ICU मधे होती म्हणून हे ऑपरेशन करणे आवश्यक होते.

भटेवारा: ही भाडेवाढ आवश्यक होती हे खरे आहे. रेल्वेच्या भाडेवाढीसाठी एक समिति आहे. ह्या समितीने फेब्रुवारी 2014 लाच मनमोहन सरकारला भाडेवाढ करायला सांगितले होते. परंतु त्यांनी ती पुढे ढकलली. 16 मे ला ते भाडेवाढ करणार होते परंतु ते म्हणाले की नविन सरकारच हा निर्णय घेईल. तरीही नवीन सरकारने संसदेच्या अधिवेशनात ही बाब मांडायाला हवी होती. एव्हडी घाई नको होती.

भातळकर: पेशंट ICU मधे असल्यावर ऑपरेशन करणे कसे थांबवता येईल.

अभ्यंकर बोलत असताना भातळकर मधेच बोलले तर अलका त्यांना म्हणाली आता तुमचे सरकार आले आहे तर त्यांना बोलू द्या ना ! आयबीएन लोकमतवर भाजपच्या लोकांना असेच गप्प बसवले जाते.

मला एकाचेच म्हणने पटले ते म्हणजे प्रवासी संघटनेचे प्रवक्ता यांचे. त्यांचे म्हणने होते की भाववाढ आवश्यक होती, पण ती थोडीथोडी आणि टप्प्याटप्प्याने करायला पाहिजे होती.

या भाववाढीविषयी बऱ्याच जणांनी 'हेच मोदी सरकारचे आच्छे दिन आहेत काय ? अशी टर उडवली. एका महिन्याच्या आत मोदिंनी लोकांना महगाईच्या खाईत लोटले असे बाहेरही मुले बोलत होती.


खरे पाहिले तर मुंबईकरांसाठी ही भाडेवाढ फक्त १४.२% नसून १००% ते १५०% आहे. कारण दरवाढी बरोबरच रेल्वेने मासिक पासात अशी वाढ केली आहे की पासाची किंमत दुपटीने वाढली आहे. आणि हे फक्त मुंबईकरांसाठीच आहे. कारण रेल्वेला मुंबईच्या लोकल गाड्यांतुनच सर्वाधिक उत्पन्न मिळते आणि सुविधा काही नाहीत. चेंगराचेंगरीतच प्रवास करावा लागतो. इतर राज्यातील बरेचसे प्रवासी फ़ुकटे असतात.
यापूर्वी मासिक पासासाठी १५  एकेरी प्रवासाच्या  तिकिटाचे दर एकत्रीत करुण मासिक पासाची किंमत काढायचे ते आता ३० एकेरी प्रवासाच्या तिकिटाचे दर एकत्रित करुण मासिक पास देण्याचे ठरले आहे. त्यामुळे मुंबई उपनगरी लोकल पासाचे दर एकदम दुप्पट ते अडीचपट झाले. हे मुंबईच्या लोकांसाठी अन्यायकारक दरवाढ आहे. यामुळेच बरेचसे लोक चिडले आहेत. आंदोलने, रास्ता रोको, रेल रोको, ठिय्या आंदोलन असे बरेच काही चालले आहे.

सुरुवातीलाच भाववाढ करायची आणि निवडणुका आल्यावर करायची नाही हे काँग्रेसचे राजकारण मोदी सरकारने करू नये एवढिच मोदींकडून अपेक्षा.

या बाबत आनंदाची बातमी आली आहे, ती नंतर सांगतो.

सोमवार, १६ जून, २०१४

राज ठाकरे निवडणुक लढ़वणार


दिनांक: 1 जून, 2014

काल मुंबईच्या सोमय्या कॉलेज (शिव, सायन) मैदानावर राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. सभेला दिडदोन लाखाची गर्दी होती. 'मला तुमच्याशी काही बोलायाचय' असे आवाहन करुण सभा भरवली होती. हरल्या नंतर इतक्या लवकर सभा घेणारा मी पहिलाच असे ते म्हणाले. त्यांच्या भाषणात त्यांनी खालील मुद्दे मांडले.

1. ही निवडणुक पूर्णत: मोदिंची होती. आणि जे कोणी महायुतुचे उमेदवार निवडून आले आहेत ते फक्त मोदींच्या नावामुळेच निवडून आले आहेत. पंतप्रधान झाल्याबद्दल आणि पूर्ण बहुमत मिळवल्याबद्दल त्यांनी मोदिंचे अभिनंदन केले.

2. त्यांनी हेही सांगितले की महात्मा गांधींचा खरा अनुयायी कोण असेल तर राहुल गांधी. कारण गांधींनी सांगितले होते की कॉंग्रेस विसर्जित करा, ते फक्त राहुल गांधीनेच करुण दाखवले.



3. पत्रकार विचारतात की तुम्ही नाशिक मधे काही केले नाही म्हणून हरले. त्यांनी मग पत्रकाराला एक फाइल दाखवली ज्यात चालू असलेल्या कामांची जंत्री होती. पत्रकाराने विचारले तुम्हाला नाशिकला निवडून येउन किती वर्षे झाली. तेव्हा राज म्हणाले साधारण दोन वर्ष. पत्रकार म्हणतो फ़क्त दोन वर्ष ? बरेच काम होत आहे.  आणि तरीही तो पत्रकार  म्हणतो काय  करणार  आम्हाला तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत ना?

त्यांनी असेही सांगितले की नाशिक महापालिका त्यांच्याकडे आली तेव्हा पलिकेवर साडेसहाशे कोटींचे कर्ज होते. ऑक्ट्रोय  खाजगी कंपनीकडे होता. तो पालिकेने स्वत: जमवायला सुरुवात केली तर दोनशे कोटी उत्पन्न वाढले. इतर महापालिके मधे तीस तीस वर्षे सत्ता असुनही त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही, मग मलाच का? हा शिवसेनेला टोला होता. नाशिक मधे कोणती कामे चालू आहेत त्याची फाइलच त्यांनी दाखवली. नाशिकच्या नगरसेवक, पदाधिकारी यांनाही त्यांनी झापले. मी तुम्हाला निवडून अणायाचे आणि तुमचा प्रवक्ताही व्हायचे काय? केलेल्या कामाची माहिती तुम्ही लोकांना द्यायला नको का असेही ते म्हणाले.

4. लोकसभेला मी उमेदवार उभे करणार नव्हतो. पण आमच्या पदाधिकारी आणि इतर यांच्या आग्रहामुळे मी उमेदवार उभे केले. त्यांनी मनसेला मत दिलेल्या मतदारांचेही आभार मानले. पराभव हा सत्ताधारी पक्षाचा होतो विरोधाकांचा नाही असे ते म्हणाले.

5. विधानसभेच्या निवडणुकीला तेही उभे राहतील असे त्यांनी जाहीर केले आणि आमच्या निवडून आलेल्या लोकांचे मीच नेतृत्व करेल असेही ते म्हणाले. राज ठाकारेंनी पराभवानंतर लगेच सभा घेतली हे एक वेगळेपण आहे. परंतु त्यांच्या भाषणात नेहमीचा जोश नव्हता. निवडूण आलेल्या लोकांचे मीच नेतृत्व करेल असे ते म्हणाले परंतु मीच मुख्यमंत्री होईन हे बोलण्याचे त्यांनी टाळले. त्यांनी केलेल्या भाषणात बरेचसे मुद्दे अर्धवट राहिले असे वाटले.

आपल्या भाषणात त्यांनी कॉंग्रेसला निशाना बनवले तरी शिवसेना आणि भाजप यांच्यावरही टिका केली. मला असे वाटतेकी शिवसेना आणि भाजप यांना टीकेचे लक्ष करणे चुकीचे आहे. कारण हे दोन्ही पक्ष विरोधी पक्ष आहेत. त्यांच्यावर टिका करुण काहिही फायदा होणार नहीं. कारण लोक सत्ताधारी पक्षाला कंटाळले आहेत. विरोधी पक्षांवर टिका करणे म्हणजे सत्ताधारी पक्षाची बाजु घेणे.

सध्या  मोदिंची लाट आहे आणि ती चार महिन्यांवर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकी पर्यंत टिकेल हे नक्की. (महायुतिने आपआपसात भांडणे न केल्यास). सध्यातरी  मनसेने एकटे निवडणुक लढावणे पक्षाला घातक आहे. मागील तेरा आमदार राखनेही अवघड आहे.

म्हणून मनसेकडे तीन पर्याय उरतात. हे पर्याय फायद्या  प्रमाणे आहेत.

1. सरळ सरळ महायुतीत सामील होणे -शिवसेना विरोध करीलच यात काही शंका नाही. परंतु गडकरींच्या सांगण्यावरून राज ठाकारेंनी भाजप विरोधात उमेदवार उभे केले नाहीत. (दोन अपवाद वगळता) त्यामुळे गडकरी युतिमधे मनसेला घेण्याविषयी दबाव आणु शकतील.

2. कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि महायुती सोडून शेतकरी कामगार पक्ष, प्रकाश अंबेडकर यांचा पक्ष, असे छोटे मोठे पक्ष यांची मोट बांधणे

3. कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीशी युती (aliance) करणे. - यूपी- बिहारी यांच्या विरोधातील आंदोलनामुळे पूर्वी कॉंग्रेस या युतीस कधीही तयार झाली नसती. परंतु आताची परिस्तिथि वेगळी आहे. यूपी-बिहार मधे कॉंग्रेसला काही बेसच राहिलेला नाही. मग डर कशाला. राष्ट्रवादीचा यूपी-बिहारशी काडीचाही संबंध नाही. आणि आपले पवार कधी कुठे जातील, कोणाशी युती-आघाडी करतील याचा काहीच नेम नसतो. राजची पवार साहेबांनी बऱ्याच वेळा प्रशंषा केली आहे. अजित पवारही राजविषयी कधीतरी चांगले बोलले आहेत.

हा तीसरा पर्याय मनसेला तारुही शकतो आणि मारुही.

रविवार, १५ जून, २०१४

मोदिंचा पंतप्रधान पदाचा शपथविधी


दि. 25 मे, 2014

आयबीएन लोकमत वर आजचा सवाल होता 'सार्क देशातील प्रमुखांना शपथ -विधिला बोलवून नरेन्द्र मोदिंनी नविन पायंडा पाडलाय काय?'. होय 96% नाही 4%. खरे म्हणजे असा प्रश्न विचारलाय की हो म्हणण्या शिवाय काही पर्यायच ठेवलेला नाही. कारण आतापर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांनी सार्क देशातील पंतप्रधानांना शपथविधी समारंभाला बोलवलेले नाही. मग उत्तर होयच येइल ना ?

उत्तर जर हो आले तर वागळे खुश होतात. असं एकच उदहारण नाही तर असंख्य आहेत. ही वागले की दुनिया आहे, तर असो.

नमोंनी करझाई (अफगानिस्तान), नवाब शरीफ (पाकिस्तान), शेख हाशिना (बांग्लादेश), राजपक्षे (श्रीलंका), भुतान, मालदीव अणि नेपाळ यांच्या अध्यक्ष किंवा पंतप्रधान या सर्वांना शपथविधी समारंभाला बोलाविले आहे.
या पैकी फक्त शरीफ अणि राजपक्षे यांना बोलवले म्हणून तंटा उदभवाला आहे. कांग्रेस म्हणते शरीफ यांना बोलवायला नको होते. भाजप पाकिस्तानच्या विरोधी एव्हड़े बोलतो मग शरिफला का आमंत्रण दिले. चर्चेमधे असेही कळले की लश्कर-ए-तैयब्बा ने शरिफना धमकी दिली आहे की भारतात शपथविधिला गेलात तर खबरदार ! जाणार असाल तर एकच तिकीट काढून जा. परत येण्याचे काढू नका. म्हणजे भारतातच रहा. कॉंग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ म्हणाले जर शरीफ स्वत: नाही आले अणि त्यांनी कोणा प्रतिनिधिला पाठविले तर भारताची संपूर्ण जगात नाचक्की होईल.
काय हे कांग्रेसचे प्रवक्ते. शरिफला नसते बोलाविले तरी बोंबाबोंब अणि बोलाविले तरी बोंबाबोंब. आता हे आशेच पाच वर्षे चालणार आहे.

दुसरे वादग्रस्त व्यक्ति म्हणजे राजपक्षे. त्यांना विरोध आहे जयललिता अणि करूणानिधि यांच्या पक्षांचा. राजपक्षे यांनी श्रीलंकेत तमिळि लोकांची कत्तल केली असे ते म्हणतात. नशीब चांगले की भाजपला बहुमत मिळाले. जरका सरकार बनवण्यासाठी कोणाचा आधार घ्यावा लागला असता तर काही खरे नव्हते.
(म्हणून मोदी आता सुपरमैन आहेत)

आजची आणखी नविन बातमी. भाजपने जसा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नरेन्द्र मोदींना आधीच जाहिर केले होते. तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकी आधी राजसाहेब यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहिर करावा. म्हणजे मनसेचे फुटलेले मतदार पुन्हा येतील. राजकारणात काहीही होऊ शकते याचा ढळढळित पुरवा उद्या.