बुधवार, २८ मे, २०१४

कांग्रेसच्या पराभवाला कारणीभूत दिवटे

दिनांक: 28 मे, 2014

दोन दिवसांपूर्वी भाऊ तोरासेकर यांनी त्यांचा ब्लॉग जागता पहारा वर 'दोन दिवट्याची गोष्ट' हा राहुल गांधी अणि अरविंद केजरीवाल यांच्यावर अत्यंत सडेतोड लेख लिहला होता. त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा जाणवले की ही प्रतिक्रिया माझ्या ब्लॉगवर टाकावी. भाऊ तोरसेकारान्नी या दोघांचा दिवटेपणा सप्रमाण सिद्ध केला आहे. तो लेख मुळातुन वाचण्या सारखा आहे. जिद्न्यासू वाचकांना तो लेख वरील लिंकवर वाचता येईल. त्या लेखावरील माझी प्रतिक्रिया.

भाऊ हे दोघेच नाहीत. असे अनेक दिवटे आहेत. ज्यांनी मोदींच्या विजयात खारीचा वाटा नाही तर हत्तिचा वाटा उचलला आहे.

दिवटा क्रमांक 3- नितीश कुमार- इतकी वर्षे भाजप बरोबर सत्ता भोगली. पण मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहिर केल्याबरोबर भाजपची साथ सोडून दिली. पण मुख्यमंत्री पद काही सोडले नाही. 

जे लोक निवडणुक पूर्व युती करतात ते हे विसरतात की आपल्या पक्षाला मिळालेली मते ही आपल्या एकट्याची नसून युतीतिल भागीदार पक्षाच्या मतदारांचीही आहेत. जर वेगवेगळे लढले तर मतांची टक्केवारी कमी होऊन दोन्हीही पक्ष हरु शकतात. 2010 च्या विधानसभेत जेडीयू म्हणजे नितीश कुमार यांच्या पक्षाला 112 जागा मिळाल्या अर्थात बहुमतापेक्षा फक्त 10 जागा कमी. म्हणून त्यांना वाटले की भाजपशी असलेली युती तोडली तरी 10 जागा इथून तिथून मिळवू अणि बहुमत सिद्ध करू. अणि ते मुख्यमंत्री पदाला चिटकून राहिले. अर्थात लोकांना हे पटले नसेलच. त्यात मोदिंनी बिहारच्या पुरग्रस्त लोकांसाठी पाठविलेली मदत परत केली. उपाशी पोटाला अन्न पाहिजे असते तेव्हा ते पोट हे पहात नाही की अन्न कोण देतय. बाकी कोणत्याही पक्षाबरोबर पटत नसल्यामुळे नितीश एकाकी लढले अणि स्वत:ची वाट लाऊन घेतली. भाजपने पासवानला बरोबर घेतले अणि सर्वांच्या चिंध्या करुण टाकल्या.

दिवटा क्रमांक 4 : मुलायम सिंग यादव - मुस्लिमांचे लान्गुलचालन करण्याची परिसीमा. त्यांची मजल तर इथपर्यन्त गेली की शक्तिमिल कंपाउंड मधे बलत्कार करणाऱ्या मुलांची बाजु घेतली. 'लडके है, गलती हो जाती है तो क्या फासी देंगे। हम ऐसा कानून बदल डालेंगे।' हे बोलण्याचे कारण त्या बलात्कार करणाऱ्या मुलांमधे दोन मुस्लिम तरुण आहेत. मुस्लिम मतांसाठी केलेले हे वक्तव्य. 

त्यात सोनिया गांधींनी घेतलेली इमामाची भेट. उत्तर प्रदेशातील बीचाऱ्या मुस्लीमान्ना कळेनासे झाले की कोणाला मत देऊ. मुस्लिमांची बाजु घेणाऱ्या मुलायामला की इमामाने फतवा काढलेल्या कांग्रेसला की सोसिअल इंजीनियरिंग करणाऱ्या मायावतिला. त्यामुळे झाले काय ही सगळी मुस्लीम मते विभागली गेली तिघात. त्या मधे भाजपचा झाला फायदा. कधी कधी असही वाटतं की मुस्लीम मतांचं जसं ध्रुवीकरण होतं तसं हिंदूंच्या मतांचं झाले असेल काय ? शंका आहे.

दिवटा क्रमांक 5- दिग्विजय सिंग- मुस्लीम लान्गुल चालनाचा महामेरु. जगातील सर्वात खतरनाक अतिरेकी ओसमाला हे 'ओसामाजी' असे संबोधतात. तसेच अमेरिकेने ओसमाला सुमुद्रात फेकायचे नव्हते तर व्यवस्तीथ दफन करायला पाहिजे होते असे सांगतात. 

हेच दिग्विजय रामदेव बाबाला महाठग म्हणतात.

दिवटा क्रमांक 6- अजीत पवार-फक्त महाराष्ट्रा पुरता. अजीत पवारांनी धरनातील पाणी मिळवन्यासाठी उपोषण करत असलेल्या उपोषण कर्त्याला उद्देशून जहिररित्या असे सुनवले की ' धरनात पाणी नाहीतर मी त्यात आता  मुतू  कां ?' 

तसेच लोकसभेच्या निवडणुकी आधी अशी धमकी दिली की जे गाव माझ्या बहिणीला मतदान करणार नाही त्यांचे पाणी तोडू. या सगळ्या चा परिणाम म्हणजे आघाडीचे महाराष्ट्रात पानिपत.

आणखी बरेच दिवटे आहेत ज्यामुळे लोकांना असे वाटायला लागले की नरेन्द्र मोदींवर हे लोक अन्याय करत आहेत. हिन्दू व मुस्लीम दंगे भारतात सगळीकड़े होतात व झाले आहेत. परन्तु 2002 च्या गुजरात दंगलीचे एव्हड़े अवडंबर माजविले की सांगता सोय नाही. त्यामधे मग माध्यमे , अनंतमुर्ती, अमेरिका (वीसा नाकारने) सोनियाचे 'मौतका सौदागर', 'नरेन्द्र मोदी पंतप्रधान होणं म्हणजे एक संकट' मनमोहन सिंग (Narendra Modi as PM will be disasterous), मणीशंकर अय्यर यांचे मोदींना 'चायवाला' म्हणून हिणवणे, विजय तेंडुलकर 'मला बंदूक मिळाली तर मी मोदींना गोळ्या घालेन.

बघा भाऊ एव्हडे दिवटे असल्यामुळे मोदींचा विजय आणखी सुकर झाला.

आपला नम्र,
रामदास पवार 

मंगळवार, २७ मे, २०१४

मोदींचा शपथविधी संपन्न



दिनांक: 26 मे, 2014

आज मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधि होता. सर्वप्रथम मोदींनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. एकून 45 मंत्र्यांनी शपथ घेतली त्यात महाराष्ट्राचे सहा मंत्री आहेत. नितिन गडकरी, गोपीनाथ मुंडे, प्रकाश जावडेकर, अनंत गीते (शिवसेना), रावसाहेब दानवे (जालनाचे खासदार)अणि पियूष गोयल (मुंबईचे आहेत असे वाटते). 
(महाराष्ट्रातील मंत्री)

शपथविधिला सार्क देशातील प्रमुख आले होते. त्यांत पाकिस्तानचे नवाब शरीफ, श्रीलंकेचे राजपक्षे, अफगानिस्तानचे हमीद करझाई, नेपाळचे कोइराला, भुतानचे अध्यक्ष, मालदीवचे अध्यक्ष अणि बांग्लादेशाचा प्रतिनिधि इत्यादि.
(सार्क देशाचे प्रमुख)

सोहळा चांगला झाला. सोहळ्याला चार हजार लोक उपस्थित होते. मंत्रीमंडळ सर्वसमावेशक आहे. मंत्रीमंडळात सात महिला आहेत. एकून मोदिंनी सुरुवात चांगली केली आहे. असे सर्वांचे मत होते. 

तरीही आजचा सवाल मधे कॉंग्रेसचे प्रवक्ते सतीश नाइक म्हणाले की भाजपने पडलेल्या उमेदवारांनाही मंत्री केले आहे. त्यांचा इशारा अरुण जेटली आणि स्मृती इराणी या दोघांकडे होता. तसेच व्ही. के. मालिक हे लष्कर प्रमुख होते. अणि त्यांना मंत्री बनवायला नको होते. 
(मोदिंची टीम)


हे कॉंग्रेसवाले जरा सटकलेत असं वाटतय. या प्रलापाला अविनाश धर्माधिकारी यांनी उत्तम उत्तर दिले. त्यांनी सांगितले की कोणतीही निवडनुक न लढताही मनमोहन सिंग दहा वर्षे पंतप्रधान होते. (तेही कॉंग्रेसचे). एखादा मनुष्य निवडनुकित हरला तरी त्याच्या अनुभव व हुशारीचा फायदा घेऊन त्याला मंत्री बनवने चुकीचे नाही. तसेच सैन्यदलातून निवृत्त झालेल्या माणसाला मंत्री बनता येत नाही असे कायद्यात कुठेही नाही. सतीश नाइक निरुत्तर झाले. वागळे यांनी त्यांना परत काही बोलूच दिले नाही.

शनिवार, २४ मे, २०१४

राजकारणात कोणीही कायमचा शत्रु नसतो


काल लालू यादव अणि नितीश कुमार यांनी बिहार मधे युती केली. बिहार मधल्या राजकारणातिल हे दोघे कट्टर शत्रु. तरीही नरेन्द्र मोदींच्या भाजप विरोधात ते एकत्र आले. लोकांना सांगण्यात (समजण्यात) आले की भाजप सारख्या जातीयवादी पक्षाला दूर ठेवण्यासाठी एकत्र आलो आहोत. परंतु त्यांनी मुख्यमंत्री केले ते एका SC माणसाला. ते यासाठी की SC लोकांनी त्यांना मते द्यावीत. आता तुम्हीच सांगा जातीयवादी कोण ? ह्या लोकांना हे कळत नाही की लोक आता हुशार झाले आहेत. पब्लिक सब जानती है । भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या ब्लॉग वर लिहलेय ते अगदी खरे आहे. ते म्हणतात ' बुद्धिवंत माद्ध्यमांइतके लोक बुद्धू नसतात'