मंगळवार, २७ मे, २०१४

मोदींचा शपथविधी संपन्न



दिनांक: 26 मे, 2014

आज मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधि होता. सर्वप्रथम मोदींनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. एकून 45 मंत्र्यांनी शपथ घेतली त्यात महाराष्ट्राचे सहा मंत्री आहेत. नितिन गडकरी, गोपीनाथ मुंडे, प्रकाश जावडेकर, अनंत गीते (शिवसेना), रावसाहेब दानवे (जालनाचे खासदार)अणि पियूष गोयल (मुंबईचे आहेत असे वाटते). 
(महाराष्ट्रातील मंत्री)

शपथविधिला सार्क देशातील प्रमुख आले होते. त्यांत पाकिस्तानचे नवाब शरीफ, श्रीलंकेचे राजपक्षे, अफगानिस्तानचे हमीद करझाई, नेपाळचे कोइराला, भुतानचे अध्यक्ष, मालदीवचे अध्यक्ष अणि बांग्लादेशाचा प्रतिनिधि इत्यादि.
(सार्क देशाचे प्रमुख)

सोहळा चांगला झाला. सोहळ्याला चार हजार लोक उपस्थित होते. मंत्रीमंडळ सर्वसमावेशक आहे. मंत्रीमंडळात सात महिला आहेत. एकून मोदिंनी सुरुवात चांगली केली आहे. असे सर्वांचे मत होते. 

तरीही आजचा सवाल मधे कॉंग्रेसचे प्रवक्ते सतीश नाइक म्हणाले की भाजपने पडलेल्या उमेदवारांनाही मंत्री केले आहे. त्यांचा इशारा अरुण जेटली आणि स्मृती इराणी या दोघांकडे होता. तसेच व्ही. के. मालिक हे लष्कर प्रमुख होते. अणि त्यांना मंत्री बनवायला नको होते. 
(मोदिंची टीम)


हे कॉंग्रेसवाले जरा सटकलेत असं वाटतय. या प्रलापाला अविनाश धर्माधिकारी यांनी उत्तम उत्तर दिले. त्यांनी सांगितले की कोणतीही निवडनुक न लढताही मनमोहन सिंग दहा वर्षे पंतप्रधान होते. (तेही कॉंग्रेसचे). एखादा मनुष्य निवडनुकित हरला तरी त्याच्या अनुभव व हुशारीचा फायदा घेऊन त्याला मंत्री बनवने चुकीचे नाही. तसेच सैन्यदलातून निवृत्त झालेल्या माणसाला मंत्री बनता येत नाही असे कायद्यात कुठेही नाही. सतीश नाइक निरुत्तर झाले. वागळे यांनी त्यांना परत काही बोलूच दिले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा